माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Sunday 28 February 2010

पारादीप पोर्ट

हुश्श .....शेवटी शेवटाकड़े पोहोचले.....ह्या नंतर अजुन एक आहे,,,,,,,,पण  वाटत नव्हत येइन अस.......पण आले.....ही तर फक्त माझ्या क्षेत्रा विषयी सुरुवातीची माहिती आहे.अजुन लिहाव अस बरच काही आहे......पुढे ते लिहायचा प्रयत्न करेनच..........असो
पारादीप पोर्ट हे ओरिसा मधले मुख्य पोर्ट आहे.तसच ते महानदी आणि बंगाल च्या उपसगाराला जोड़ते.ओरिसाचे मुख्यमत्री बीजू पटनाइक यानि १९५० मध्ये सुधारणा करायला घेतली.ते प्रसिद्द पायलट आणि स्वातंत्र्य सैनिक होते.
नेहेरुनी १९६२ मधे पाया भरणी चा पहिला दगड घातला.(foundation stone ) १९६६ साली हे पोर्ट व्यापारासाठी खुले करण्यात आले.पूर्वेकडचे पहिले स्वतंत्र पोर्ट.जस जशी ओरिसची प्रगती होत गेली तस-तसे हे पोर्ट पण परिपूर्ण होत गेले.
या पोर्ट ला ७ बर्थ आहेत.ब्रेक बल्क बर्थ सुद्धा आहे (ब्रेक बल्कची माहिती पुढच्या पोस्ट मधे येईलच )शिवाय ठराविक संख्येने कंटेनर लोड-अनलोड करण्याची  क्षमता आहे.
सगळ्यात मोठे असे मरीन फिशिंग पोर्ट आहे.१५० हजार स्केअर मीटर चे ओपन स्टाक यार्ड आहे तसेच ६८ जल पदार्थ साठ वाण्याची क्षमता आहे.
मुख्य आयात-निर्यात लोखंड,खते,कोलसा,स्टील,धान्य,तसेच पेट्रोलियम पदार्थ ........
पोर्ट ची साधारण रचना पुढील प्रमाणे .......
    

Saturday 20 February 2010

मोरमुगाव(mormugao )पोर्ट

चला आतापर्यंत तरी इतक्या पोर्ट ची माहिती लिहायला बरयापैकी जमलेली आहे.आता उरलेत फक्त २ पोर्ट एक म्हणजे मोरमुगाव (मोरमुगाओ)पोर्ट आणि पारादीप पोर्ट
त्यापैकी मोरमुगाव पोर्ट बद्दल थोड जुनच पण आपल्या माहिती मधे नसलेल
.............
पणजी पासून ३४ किमी वर असलेले गोव्यातील एक महत्वाचे पोर्ट.वास्को द गामा पासून ४ किमी वर आहे.चित्रकाराने एखादे सुंदर चित्र रेखाटले आहे  असे हे पोर्ट बघितले की वाटते.पोर्तुगीज याचे राजधानी चे शहर होते.ब्रिटिशांचे मुख्य व्यापाराचे केंद्र होते.१६२४ मधे बीजापुर सुल्तान आणि डच यानि हल्ले केले पोर्तुगिजानी हे हल्ले मोडून काढले.१६८३ मधे मराठयानी हल्ला केला .गोव्याची नासधूस झाली .या मुले पोर्ट चे महत्वा कमी झाले.पोर्तुगिजानी राजधानी पंजिम (आताचे पणजी) येथे हलवली.१७ व्या शतकात इथे महल बांधायला सुरुवात झाली.दुसरया जागतिक महायुद्धात याच महालात भ्रितिशानी तळ ठोकला आणि या पोर्ट वर येणारी जर्मन जहाजे उध्वस्थ केली.
१८८८ मधे हे पोर्ट अधिकृत करण्यात आले.त्या वेलेला फक्र ३ बर्थ होते.पण जसजश्या या परिसरात खाणी वाढत गेल्या तसतसा या पोर्ट चा विस्तार होऊ लागला.१९२२ मधे १२ बर्थ बांधले गेले .ख़ास करून कच्चे लोखंड (iron ore ) च्या व्यापारासाठी एक बर्थ दल गेला.दुसरया जागतिक महायुद्धानंतर जपान च्या नविन बांधणित या पोर्ट चा महत्वाचा वाटा होता.लोखंडाच्या निर्यातित ब्राझिल आणि ऑस्ट्रेलिया करून बरीच मोठी टक्कर होती त्यामुले अधिक-अधिक प्रगती करण्यात आली.२० व्या शतकात याची क्षमता वाढली.
या पोर्ट वरुन जपान,चाइना ,कोरिया आणि यूरोप ला निर्यात होते.
मुख्य निर्यात फ्रोजेन फिश,zinc oxcide ,ग्लास फायबर .
मुख्य आयात :POL crude ,सीमेंट .
या पोर्ट चा शेवटचा पण महत्वाचा भाग म्हणजे इथे जहाजाची दुरुस्ती होते,तसेच जुने,कामातून गेलेले भाग बदलणे,स्वच्छता ,रंग देणे आदि ची ही सुविधा आहे.आशय सुविधा ठराविक पोर्ट वरच उपलब्ध असतात.


(या पोर्ट चे चित्र मला मिळू शकलेले नाहीये.जेव्हा मिळेल तेव्हा टाकेनच)
ता क काही शब्द मराठी मधे टाकता आलेले नाहीयेत.मराठी शब्द मला माहित नाहीत म्हणून.
 

Sunday 14 February 2010

मंगलोर पोर्ट

मंगलोर पोर्ट हे कर्णाटक मधले महत्वाचे पोर्ट असून याची माहिती पुराण काळात पण सापडते.श्रीराम-रामायण ,पांडव ,सहदेव-महाभारत,अर्जुन,कृष्ण -भगवतगीता मधले बरेच प्रसंग इथे घडून गेलेले आहेत.
१५०० पासून १७६२ इथे पोर्तुगिजांच राज्य होते.१७६२ मधे म्हैसूर चा राजा हैदर अली ने यावर कब्ज़ा केला आणि १९६७ पर्यंत राज्य केले.१७६७ मधे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यात १७८३ पर्यंत होते नंतर हैदर अलिचा मुलगा टीपू सुलातानाने परत स्वताच्या ताब्यात घेतले.
दुसरया अंगालो-म्हैसूर युद्धात टीपू सुल्तान अह्राला आणि परत हे पोर्ट ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.ता कालावधीत शिक्षण आणि उद्योग मधे समृद्ध झाले आणि महत्वाचे व्यापाराचे केंद्र बनले.२० व्या शतकात वाणिज्य,व्यापार आणि माहिती तंत्र चे मुख्य केंद्र बनले.जहाज बांधणी आणि मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय.नंतर त्यात कॉफ़ी,काजू,कापूस यांची भर पडली.जुन्या पोर्ट वरुन या गोष्टी मुख्यत्वे आयात-निर्यात होत होत्या.
१९७५ मधे इंदिरा गांधी यांनी नविन पोर्ट चे उद्घाटन केले तेव्हा ९ वे मुख्य पोर्ट होते.१९८० पर्यंत ते केंद्र सरकारच्या देखरेखीखाली होते.नंतर ते पोर्ट ट्रस्ट बोर्ड च्या तबय्त देण्यात आले.तेव्हा त्याची कामगिरी घसरली.१० व्या क्रमांकावर आले.
येथून होणारी निर्यात म्हणजे लोखंड,पेट्रोलियम ,तेल ,ग्रानाइट आणि कंटेनर मधून जाणारा माल.
येथून होणारी आयात म्हणजे लाकडाचा लगदा.लिक्विड अमोनिया ,खाते,फोस्फोटिक आम्ल वगैरे.
एकूण १२ बर्थ आहेत.त्यातील ४ बर्थ फक्त POL (पेट्रोलियम,ऑइल आणि लुब्रीकंट) साठीच वापरले जातात
नविन पोर्ट ची रचना साधारण पणे अशी आहे

 

Thursday 4 February 2010

कोची/कोचीन पोर्ट

कोची किंवा कोचीन पोर्ट दक्षिण भारतात वसलेले आहे.हे पोर्ट नैसर्गिक असून सगळ्या प्रकारच्या वातावरण मधे उपयोगी येऊ शकते.congestion फ्री म्हणजेच जिथे जहाजांची सहसा गर्दी होत नाही.असे हे पोर्ट आहे.
१२ शतकाच्या आधीपासून मसाल्याच्या व्यापारामधे व्यस्त आहे.१२ व्या शतकापासून या पोर्ट चे महत्व वाढले  जसे १३४१ मधे "कोडून गल्लुर  पोर्ट" चक्री वादळ आल्यामुले पूर्णपणे कोलमडले.
१५०३ ते १६६३ मधे पोर्तुगल यांच्या ताब्यात कोची पोर्ट होते.
१८०० शतकाच्या शेवटी मालाची वाहतुक वाढली.मद्रास सरकार ने रोबेर्ट ब्रिस्टो नावाच्या अभियांत्याला हे पोर्ट नव्याने टायर करण्यासाठी बोलावले होते.त्याने २० वर्षात सगळ्यात सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीचे पोर्ट तयार केले.
स्वातंत्र्यानंतर १९९० च्या मध्य पर्यंत कोची पोर्ट ला आर्थिक फटका बसला.
२१ व्या शतकात पोर्ट ची क्षमता वाढली.नविन उपकरणे ,नविन तंत्र या मुले कोची केरळ ची व्यापाराची राजधानी झाली.तसेच भारताचे महत्वपूर्ण पोर्ट मानले जाते.
कोची पोर्ट वरुन चहा,सीफ़ूड,मसाल्याचे पदार्थ,कॉफी निर्यात होते तर खाते,बी-बियाणे आणि मशीनरी आयात केली जाते.
कोची पोर्ट ची रचना साधारण पुढील प्रमाणे आहे.
  

Wednesday 3 February 2010

कोलकता पोर्ट

कोलकता पोर्ट हे सगळ्यात जुने आणि नदी जवळ  वसलेले पोर्ट आहे.ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने बांधले होते.मुग़ल आणि औरंगजेब कडून व्यापाराचे हक्क मिळाले मग १८७० मध्ये बांधले गेले.दुसर्या महायुद्धात या पोर्टने महत्वाची कामगिरी बजावली.जापानी सेनेने २ दा बोम्ब स्पोट केले. १९ व्या शतकात मुख्य पोर्ट होते.पण स्वातंत्र्यानंतर या पोर्ट चे महत्व कमी झाले.त्याची प्रमुख कारणे म्हणजे बंगालची फाळणी,पोर्ट चा कमी झालेला विस्तार आणि त्यामुले खालावलेली आर्थिक स्थिती.
२१ व्या शतकात या पोर्ट चा विस्तार झाला.सर्व सोयी सुविधा मिलाल्या.त्यामुले आर्थिक प्रगती  झाली.पोर्ट वरचा कामाचा बोजा वाढला.२००४-२००५ मधे सगळ्यात वेगाने प्रगती करणारे म्हणून हे पोर्ट मानले जाते.
भारतातले दुसरे कंटेनर पोर्ट म्हणून ओळखले जाते.
कोलकता पोर्ट आणि हल्दिया डॉक एकत्र पणे येथे कार्यरत आहेत.कोलकता पोर्ट ला किद्देरपोर डॉक ला १८ बर्थ आहेत,नेताजी सुभास डॉक ला १० बर्थ आहेत आणि ६ पेट्रोलियम व्हार्फ़ आहेत.

हल्दिया पोर्ट ला १२ बर्थ आहेत तसेच ३ ऑइल जेट्टी असून ३ बार्ज(खोलगट आकाराची बोट ) आहेत.
पुढील चित्रात बार्ज आणि टगबोट (बार्ज ला ओढून नेणारी बोट )

कोलकता पोर्ट ची रचना 


कोलकता पोर्ट वरुन मुख्यत्वे साखर ,तांदुळ ,लोखंड, स्टील,मशीनरी ,एलपीजी आणि जल पदार्थ आयात केले जातात तर चहा,जुट ,गहू ,मका,वगैरे निर्यात केले जातात.  

 

Monday 1 February 2010

पायापाशी दुनिया झुकाव ........वकाव.....

पायापाशी दुनिया झुकाव ....वकाव.....एका मराठी गाण्याचे हे शब्द .........हे सामर्थ्य आहे फक्त आणि फक्त आपल्या नविन पिढीच्या मुलांमधे ............अश्याच मुलांमधे काढलेला एक दिवस..........संस्मरणीय असा कालचा रविवार ठरला.त्याच झाल अस की महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमधे दिशा डेवलपमेंट ट्रस्ट आणि रोटरी क्लब सिंहगड रोड  तर्फे आयोजित "सृजन वाग्यज्ञ २०१० " मधे जवळ जवळ १२०० शालेच्या मुला-मुलींची वक्तृत्व स्पर्धा होती.पाचवी ते दहावी च्या मुला-मुलींचा यात सहभाग होता.मी तेथे स्वयंसेवक म्हणून गेले होते.माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी ही होत्या.सकाळी ८.४५ पासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आम्ही अखंड फिरत होतो.धावपळ करत होतो.मुलाना वर्गात बसवणे, त्याना सगळ्या सूचना देणे,परिक्षकानी दिलेल्या मार्कांची बेरीज करून दुसर्या फेरिसाठी निवड,प्रत्येकाला दिल्या जाणार्या प्रशस्ति पत्रकांवर नावे घालणे आदि कामे आमच्याकडे होती.पण त्यातही खुप मजा आली.सगळ्या वयोगटाच्या मुलांसोबत गप्पा मारायला मिळाल्या.त्यांचे विचार ऐकायला मिळाले.
आपली नविन पीढ़ी काय विचार करते हे बघून आपण थकक होउन जातो.दुसर्या फेरितुं प्रत्येक इयात्तेमधाली ३ मुले आणि ३ मुली निवडल्या गेल्या.त्याना बक्षिसे "हरिशचंद्राची फक्टोरी चे दिग्दर्शक परेश मोकाशी "याच्या हस्ते देण्यात आली.ढोल-ताशाच्या गजरात हा समारंभ झाला.आणि विशेष म्हणजे प्तात्येक मुलाला प्रशस्ति पत्रक ,एक पुस्तक आणि एक रोप भेट म्हणून देण्यात आले.सुट्टीचा दिवस असून मुलांचा उत्साह प्रचंड होता.
माझ्या माहितीत अशी भव्य स्पर्धा प्रथमच घेण्यात आलीये."मराठी मागे पडलीये" जे बोलतात त्याना सांगावेसे वाटते की या आणि बघा...........
कालच्या सकाळ मधे "चला बोलूया चला ऐकुया "अशी या स्पर्धेची बातमी आलेली आहे.तुम्ही ती वाचली असेलच.
त्याची काही क्षणचित्रे ...........तुमच्यासाठी.........
  आयोजक राउत सर परिक्षकाना सूचना देताना.
उपस्थित मुले..........






परेश मोकाशी यांच्या हस्ते बक्षिस स्वीकारताना विजेते मुले......आणि विशेष म्हणजे अंध मुलानी खुल्या गटातून बक्षिसे पटका  वलियेत







मराठी पाउल पड़ते पुढे...................