दिवाळी शी माझे काही वाकडे नाही.पण त्या सोबत आलेल्या प्रश्नांनी मी हैराण झाले होते.आणि नेहेमीप्रमाणे माझे प्रश्न शत्रू (?) होते नेहेमीप्रमाणे माझी भाचे कंपनी! आणि नेहेमीप्रमाणे असे प्रश होते कि ज्याची उत्तरे माझ्याकडे नव्हती.
त्यातल्या एकाशी पहिल्यादिवशी झालेला हा (सु)संवाद (?)
"आत्या,दिवाळी साठीच गाणं कोणत ग?"
"दिन दिन दिवाळी,गाई म्हशी ओवाळी..."पुढे मी काही म्हणायच्या आताच त्याने हाताने "बास"असा इशारा केला ...चला सुटलो ,कारण पुढच गाणं मला येत नाही हे त्याला कळणार नाही असा मी मनात म्हणे पर्यंत त्याचा प्रश्न "गाई म्हशी ओवाळतात ना ?मग तेल लाऊन अंघोळ झाल्यावर आई आपल्याला का ओवाळते ?गाई म्हशींना का नाही?"
माझी विकेट पडलेली !!!
वेळ मारून न्यायला मी म्हटलं " अरे ,गाई-म्हशींना पण ओवाळतात "वसू बारसेला" आणि आपल्याला अभ्यंग स्नानाच्या दिवशी!!"
लगेच त्याचा पुढचा प्रश्न "मग गाई म्हशींना तेल लाऊन अंघोळ का नाही घालत?"
"ते तू आईला विचार "-इति मी
हा (सु)संवाद (?) इथे संपला
खरे फटके लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फुटले
"मावशी,लक्ष्मीपूजन म्हणजे पैश्याची पूजा ना ?"
बरोबर -मी
म्हणजे घरात असलेली लक्ष्मी वाढावी म्हणून हि पूजा करतात ना ?
हो .मी -किती शहाणी आहे ,लहान असून पण तिच्या आईने सांगितलेलं कस लक्षात ठेवलंय असं मी म्हणेपर्यंत(अर्थात मनातल्या मनात) तिचा निरुत्तर करणारा प्रश्न माझ्यावर सुतळी बॉम्ब पेक्षा मोठ्या आवाजात फुटला
मग त्या दिवशी एवढे फटके का फोडतात ?-इति रुचा
आनंद साजरा करण्यासाठी !
मग हे असे इतके फटाके फोडून लोक पैसे वायाच घालवतात ना?त्यात प्रदूषण किती होते .असे पैसे वाया घालवून आणि घरात लक्ष्मीची पूजा करून पैसे कसे वाढणार ???
त्यापेक्षा नको ती दिवाळी आणि नको ते फटाके ......
.
.
या प्रश्नांचे उत्तर आहे का कोणाकडे???
No comments:
Post a Comment